Friday, May 4, 2012

सन १९५३. माझी शाळा Robert Money School .
दादर-GranTरोड नित्याचा प्रवास....

८ वी ची वार्षिक परीक्षा...भूमिती (Maths )चा पेपर just सुरु होणार.... 

माझ्या लक्षात आले कंपास box घरीच विसरलो...त्यात सगळेच..पेन-पेन्सिल सुद्धा...

रडवेला झालो..वर्गावर आमच्या उजगरे बाई होत्या...त्याना सांगितले, त्यांनी त्यांचे पेन दिले पण पुढे काय ?

काही सुचेना.डोळे मिटून बसलो इतक्यात बाईंचा डोक्यावर हात फिरला...त्यांच्या हातात माझीच...हो...माझीच कंपास box होती...

"घे आई आली होती तुझी द्यायला...आता शांत मनाने पेपर लिही"

मी चमकून दाराकडे पाहिले...हो आई होती तिथे आणि माझ्याकडे जरा पाहून हसून… गेली की...!!! तिला आत प्रवेश नव्हता...

मन चक्रावले...दादरहून आई आली...!!!! अगदी वेळेवर....देवासारखी...
गळ्यात जडपणा आला...डोळे पाणावले...

असे म्हणायला हवे होते ना....."आई...तू धन्य आहेस...मातृदेवो भव" ..नाही सुचले...लहान होतो ना?

मित्रानो, असे आनंदाश्रू आणि अशा कोवळ्या वयात तुम्हीही कदाचित अनुभवले असतील...कदाचित हे आनंदाश्रू...असा गळा जड होणे नंतरच्या आयुष्यात अनुभवला असेल...

सांगा तुमचे अनुभव...



M. P. Thatte 25-04-2012

No comments: