Wednesday, December 9, 2015

Wednesday English.
◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘
Page 3 Mentality
The term "Page 3" has been imitated internationally by newspapers since long (may be since 1902 as what Google says) and may have its origin in "tabloid journalism"
Why have I titled it “Page 3 Mentality”..??
Be it in society or in commercial world, there exists an undisputed dark side of the mind-set of the “richness ethos”
Publicity hunger, conjugal dissatisfaction, sin–dwellers and money thirsty females …these are the creators of this dark side of the society.
Obviously, the “page 3” attracts readers of all age groups and thus the revenues of publishers accumulate and add and again add...
“Page 3 Mentality” is seen all over. There are parties and get-togethers to nurture it.
There is also a “dress code” in these parties…No..not the “dress” you have in mind.
It is the dress of the mind and you have to undress the mind by removing the संस्कार or the श्रद्धा that you may have cherished thus far and replace that by falsehood, disloyalty and showmanship.
You walk knee deep in that filth of mentality and emerge as a discard when the party ends.
And, yes…. like a genuine drunkard your urge to return to this hell graduates to a new level such that you keep nosing around for more such parties.
That, my friends, is the “Page 3 Mentality” as understood by me.
M. P. Thatte
09-12-2015
कधीतरी, कुठेतरी फिरून भेटशील का..?
अनोळखी मुशाफिरा, वळून पाहशील का..??
◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘
मित्रांनो...ह्या आकर्षक ओळी लता मंगेशकरच्या एका मधुर गीताच्या आहेत. फार जुने आहे हे गीत...१९५० च्या आसपासचे....माझ्याकडे ते आहे.
आज ह्या ओळी मी इथे देत आहे ते आपल्यातल्या सुजाण आणि कल्पक अशा मित्रांसाठी...
थांबा..."आम्ही त्यातले नाही.." असे म्हणून आत्ताच माघार घेऊ नका...प्रत्येकात एक कल्पक, एक विचारवंत आणि म्हणून एक लेखक लपलेला असतोच...त्याला जरा आवाहन करायचं...बस...
ह्या वरील ओळी निरनिराळ्या situations चित्रित करण्याजोग्या आहेत...
जरूर प्रयत्न करा आणि सुंदर असे एक दोन paragraphs ह्यावर तुमच्यापैकी काहींनी लिहावे असे मी सुचवतो...
(That "Mushafir" might as well be anything other than a person.....or a person.)
मधुसूदन थत्ते
०५-०१-२०१५
एका कवीने म्हटले होते...
"मला वाटते वेलीवरले व्हावे सुंदर फूल.."
जुनी आहे ही कविता...माझ्या बालपणाची....
कोण जाणे कुठे मिळेल पूर्ण...पण मिळो, न मिळो...त्या एका ओळीत खूप काही आहे विचार करायला...
===========================================
मित्रांनो,
असं "मला वाटते..." ह्या सदरात काय काय मनी आणता येईल, नाही का..??
हे क्षणिक सुख नव्हे...निरंतर सुख...पण अल्प काळाचे...
एका संस्कृत सुभाषितात म्हटले आहे..
"मुहुर्तम ज्वलितं श्रेय: नच धूमायितं चिरम..."
(वर दिलेले सुभाषित बरोबर लिहिले आहे ना?.Mandar Bhat)
कोण्या थोड्या काळासाठी अग्नी पेटून उठावा हे श्रेयाचे ..सदैव धूर येत रहाण्यापेक्षा
हे ते निरंतर सुख ..पण अल्प काळाचे...
मधुसूदन थत्ते
१७-०९-२०१४
तन्मयाने... Tanmaya Panchpor...."In Praise of मुंबई" अशी एक सुरेख post टाकली आहे....तिचे मराठीप्रमाणेच इंग्रजी भाषेवरचे प्रभुत्व स्पष्ट झाले (अखेर मुंबईकर आणि त्यात engineer !!!!!)
पण त्या विषयावर म्हटले थोडे वेगळे लिहावे ...
मुंबई ही तर माझी जन्मभूमी...आणि ती होती त्या काळी Bombay ...
सात दशके मागे गेली आहेत ..
मी आज हे शहर दोन अस्तित्वात पहातो..
१) ते शहर म्हणून ..metropolitan शहर भारताची आर्थिक राजधानी...दिमाखाचे असे एक अस्तित्व...अहोरात्र जागे आणि झगमगणारे अस्तित्व...गगनाशी स्पर्धा करणारे शहर...सागराला मागे ढकलणारे शहर...
२) तो एक सकल मुंबईकरांचा एकवटलेला आत्मा म्हणून....
वरील १ बद्दल:
दशके आली आणि गेली...शहर खूप खूप बदलले, आकर्षक झाले...पण "माझे" नाही उरले...आज मागे ढकललेला समुद्र केविलवाणा झाला आहे...किना-यावरचा त्याचा वाळूचा अंगरखा ...चिंध्या झाल्यात त्याच्या...पोहण्याचे तलाव अमाप गर्दीने "डाळिम्ब्यांची उसळ" दिसते वरून...इमारती आभाळाला बोचतात...पश्चिमेचा वारा येतो खरा पण आल्हाद नाही देत....सुवास नाही देत....शहराला पण एक माणुसकी असते...एक जिव्हाळ्याचा स्पर्श करत असते शहर ...तो स्पर्श आज नसतो...
तेव्हा मी Lamington रोड वरून थेट काळा घोडा पर्यंत चालत जायचा...खूप खूप आनद मधासारखा गोळा करायचा...दादरला घरी येऊन तो चाखायचा...
आज धक्के धुक्के खात मी जाईन तसा चालत कदाचित..पण एकदाच...नंतर नाही वाटणार पुन: जावे...
वरील २ बद्दल
माझ्या मुंबईचा आत्मा (जो सकल मुंबईकरांचा एकवटलेला असा आहे) मात्र आज होता त्याहून निखरला आहे...अधिक उदात्त झाला आहे...अधिक श्रद्धाळू झाला आहे...आगत-स्वागत करण्यात अग्रेसर आहे...इथे माणुसकी वाढली आहे...जिव्हाळा वाढला आहे....हा मुंबईचा आत्मा थकून जातो...पण तरीही सौजन्य सोडत नाही...
सर्वामुखी बोलावतो..."या...रहा इथे....." असेल हवेची कमी..जागेची कमी..पाण्याची कमी....So what म्हणतो आणि सुरेख हसतो...हसणारा हा मुंबईचा आत्मा पाहून माझ्या सारख्या आज पुणेकर झालेल्याला मनात लग्गेच तुलना येते......
काश....वरच्या १ मध्ये असा स्वागतार्ह बदल होता तो ....!!!!
मधुसूदन थत्ते
२६-०८-२०१४
पूर्वी मुंजीत बटूला गोष्टीची पुस्तके मिळायची... खजिनाच वाटायचा तेव्हा तो...
असाच मला १९५२ सालच्या माझ्या मुंजीत पुस्तकांचा खजिना लाभला होता...गोट्या, चंदू, किती हसाल?, शामची आई...अशी खूप पुस्तके...त्यात एक होते "सुलेमानचा खजिना" नावाचे...त्या कथेवर एक इंग्रजी चित्रपट पण होता "King Solomon’s Mines " असा ....
ह्याची आज आठवण व्हायला निमित्त म्हणजे Reader's Digestचे "Amazing Places " ह्या पुस्तकातले एक चित्र (सोबतचा स्कॅन पहा)
तिथल्या सोन्याच्या खाणीची म्हणे एक चेटकीण राखण करायची ...
कोणा कोणाला आठवतेय ती गोष्ट?
मधुसूदन थत्ते
३०-०४-२०१४
Khushwant Singh (born 2 February 1915)....
Many of you may recall this great journalist whose career span exceeded over five decades and was full of provocative and controversial views of his.
He was the editor of The illustrated Weekly [It started publication in 1880 (as Times of India Weekly Edition, later renamed as The Illustrated Weekly of India in 1923) and ceased publication in 1993.]
I came across his autobiography….a 423 page colossal book. (See the scanned image attached.) Apart from his attractive style of writing, this gives a thorough picture of Indian politics of his era.
M. P. Thatte..
06-02-2014
आम्ही मराठी...मराठी...
================
एक संवाद ऐकत होतो...
बहीण..."मराठी माणसाला साहस नाही...स्वत: चाकोरी सोडणार नाहीच आणि दुसरा जर दिसला चाकोरी सोडताना तर त्याचे पाय खेचेल घाबरवून..."
भाऊ...."हो ना...असे काही नवे क्षेत्र त्याला चुकून समजले जरी तरी आधी सगळे नकारात्मक विचार येतील ह्याच्या डोक्यात..अमकं झालं तर...तमके करणे सोपे नाही, खूप अडचणी येणार...वगैरे..."
मग मी शिरलो त्या संवादात...
मी..."मुला, हे तू म्हणतोस तसे एक उदाहरण दे पाहू..."
तो..."आत्ताच घडलं आहे काका..माझ्या ह्या मैत्रिणीला एक नवे क्षेत्र कळले...व्हीडीओ एडिटिंग, फोटो एडिटिंग, मिक्सिंग ह्या क्षेत्रात खूप काही करता येईल...खूप वाव आहे...Profession म्हणून खूप संधी आहेत....वगैरे...
"पण लग्गेच तिच्या घरच्यांनी केले सुरु लाल झेंडे दाखवायला...कोर्स खूप महागडा आहे...हल्ली ह्या क्षेत्रात जो उठतो तो जातो...मेहेनत खूप पण returns फार कमी...शिवाय रात्री अपरात्री कामे करावी लागतात...TV SERIALS किंवा जाहिराती क्षेत्रात किंवा अगदी फिल्म क्षेत्रातही....हे मुलींसाठी नाही...
"हे असे असते कचरणारे मराठी मन...काका, ह्या मुलीला तर जायचे आहे पण हे असे अडसर लागलेत मधे... हेच कुणी पंजाबी. बंगाली मुलगी लीलया ह्यात शिरते, नांव कमावते... सांगा आहे की नाही हे खरे...?"
त्याचे विचार मला खोडून काढता आले नाहीत..मराठी माणसाच्या वतीने मला काहीच बोलता आले नाही..
इतकेच म्हणालो..."आहे खरे असे बाबा....पण असे सरसकट विधान सा-या मराठी लोकांना उद्देशून जर असेल तर जरा विचार करावा लागेल..."
मित्रांनो...ह्यावर मराठी माणसाच्या वतीने तुम्ही त्या मुलाला अनुमोदन देणार की चूक ठरवणार ?
मधुसूदन थत्ते
२६-०१-२०१४

Wednesday, December 2, 2015

रिदम...

शब्दातच कसं आगळं आकर्षण आहे.

४०-५० वर्षांपूर्वी मुंबईला संगीत साधनांच्या एका भव्य दालनाला नाव दिलं होतं "रिदम हाउस". केवळ ह्या नावामुळे मी तिथे जाऊन आलो होतो एकदा.

पण रिदम केवळ संगीतातच असतो का...? नाही...तो तर आपल्या उभ्या अस्तित्वात असतो...ती एक लय असते...एक समेवर सातत्याने येणारा ताल असतो...एक धृपद असते ज्यावर येउन आपण थबकतो...आणि पुन: मार्गी लागतो...

काव्यात रिदम आहे...निसर्गात रिदम आहे...ऋतूत रिदम आहे...असं म्हणतात की ताल वाद्य माणसाला सुचलं ते टप टप अशा कमलदलावर पडणा-या पावसाच्या जल बिंदुंच्या आवाजामुळे...

मी सकाळी फिरायला जातो..माझ्या चालण्यात रिदम असतो...मी नामस्मरण करतो त्यात रिदम असतो...रुळावरून धावणा-या गाडीच्या जाण्यात रिदम असतो...इतकंच काय, माझ्या विचार करण्याच्या पद्धतीत असलेला रिदम मला जाणवतो आणि लक्षात येतं.... अरे आपण हा विचार तर आधी केला होतं...आणि मग मी त्याला आणखी जरा पुढच्या पायरीवर नेऊन ठेवतो...

सागर लहरींचा रिदम असतो...सागराचा भरती-ओहोटिचा रिदम असतो आणि युगा-युगात कोलंबस जन्माला यावेत असा विधात्याने निर्मिलेला रिदम असतो.

आकाशस्थ ग्रहांच्या अंतराळात भ्रमण करण्याला रिदम असतो...म्हणूनच की काय..दर साडे बावीस वर्षांनी शनीची साडेसाती येते आणि दर अडीच दिवसांनी चंद्र...जो आपल्या मनाचा कारक आहे...राश्यांतर करतो आणि आपल्या मनाला डोलवत रहातो...

मी बेताल कधीच वागणार नाही...आणि बे-रिदम जगूही शकणार नाही...

मधुसूदन थत्ते
०३-१२-२०१५