Saturday, June 13, 2015

NO..No..No No...मला कुठल्या TV सिरियलवर लिहायचे नाही मित्रांनो..

ती एक कोकणातली अविस्मरणीय कथा आहे...वाचावी आपण पुढे..

खूप जुनी गोष्ट...६५ वर्षापूर्वीची...त्यातली मी धरून फक्त २-३ पात्रे आज ह्यात आहेत...

आम्ही दादरहून तळकोकणात गेलो होतो..मी, माझे आई-बाबा आणि एक शेजारची १८ वर्षाची नववधू ...नाव कुसुम...

गरती कुसुम माहेराला आली अन कावीळ झाली...    घरी एकटी आई...त्यात ती होती लंगडी..पण पक्की तळकोकणी मात्र... 

काविळीवर उत्तम उंपाय करणारे तिच्या गावी होते एक गृहस्थ... पण कुसुमला न्यायचे कोणी अन कसे..?

अशा वेळेला माझे बाबा सदैव जबाबदारी घ्यायला तत्पर असायचे...अन अशा प्रकारे आम्ही चौघे पोचलो त्या तळकोकणातल्या 

खोलखंडोबाच्या गावी...

चौकशी केली..त्या गृहस्थाना भेटलो...त्यांना अण्णा म्हणत. अण्णांनी आमची सोय शेजारच्या मोकळ्या अन टुमदार घरी केली..

काय सुरेख घर होते ते..मला अजून आठवतय तो समुद्राचा गाज..वा-याची फडफड...आणि घराच्या झरोक्यातून अधून मधून येणारी फू 

फू....वा-याचा झरोक्याताला तो आवाज अजून माझ्या कानात आहे

...
पण त्याचे कारण वेगळे आहे..

लगेच औषध सुरु झाले..तो होता मंगळवार. 

"
एक दिवस अजून थांबा..मी उद्या तपासतो अन मग जा मुंबईला".. अण्णांची आज्ञा झाली 

दिवेलागणीला डावीकडे सूर्य पाण्याला टेकत होता तोच दारी शेजारची एक नववधू आली.गरती होती. सुरेख असे नऊ-वारी लुगडे..नाकी

 नथ..हाती झाकलेले असे काही ...अन मधुर आवाजात आईला म्हणाली..


"
आई, नमस्कार करते..." अन तो सुंदर असा वाकून तीन वेळा केलेला नमस्कार..हल्ली दिसत नाही असा फारसा..

"
मला कळल आलात..मी शेजारचीच आहे..अण्णांच्या पलीकडची..मोदकाचा प्रसाद आणलाय.."

तिने रुईच्या पानातला तो प्रसाद आईला दिला ..."

"
अगं आत ये, बस जरा..." माझी आई म्हणाली..

"
नको..आधीच उशीर झालाय...मैत्रिणी जमल्यात तिथे पारावर..."...ती उत्तरली...कुसुमकडे पाहून गोड हसली अन झाली पसार...

जरा वेळाने अण्णाही आले... "हा अंगारा घ्या..कुसूमला निजताना लावा नक्की..."

निजायची वेळ झाली...

काय उंदीर होते त्या परिसरात...असे सुळकन पळायचे इकडून तिकडे...

माझ्या आईने मोदकाचा प्रसाद आणि अंगारा ईशान्येला कोप-यात ठेवला ...देव असतात ना त्या दिशेला...!!!

मध्यरात्री केव्हातरी खूप वारं सुटल्याचा आवाज होत होता...भिर्र भिर्र.फर्र फर्र...

मी जागा तर झालो पण भीती वाटत होती..हळूच एक डोळा उघडून वर पाहिले ..झरोक्यातून आवाज येतच होता वा-याचा...भिर्र भिर्र

.फर्र फर्र...च्या जोडीला फू फू....!!!!


सकाळी ईशान्येच्या कोप-यात आई देवाला नमस्कार करायला आणि कोप-यात ठेवलेले मोदक आणि अंगारा घ्यायला आई जाते तो 

काय...उंदरांनी मोदक पळवले होते की...!!!

आज आम्ही निघणार परतीला..निरोपासाठी अण्णांच्याकडे...जायचे..तर मधेच आई थबकली...

"
ती कालची मोदक देणारी मुलगी मी ह्या घरात पाहिली...चला जरा भेटन येऊ..."


गेलो घरात...मंगळागौरीच्या गाण्यातले बसफुगडीचे गाणे गोड आवाजात ती मुलगी म्हणत होती.. फू बाई फू फुगडी फू...फू बाई फू 

फुगडी फू...आणि सुंदर खळखळून हसली.
..

आईने ओळख करून दिली-घेतली..

"
काय गोड आवाज आहे हो तुमच्या मुलीचा...बोलावता का तिला....??"...आई म्हणाली..

"
माले...ये ग जरा बाहेर..." हाक दिली आईने..

मालू आली....अन...अन...लंगडत आली..तिचा एक पाय अधू होता..!!!!

आई पहातच राहिली...म्हणणारच होती "तूच काल आली होतीस ना...??" पण थांबली..

मालूची आई पुढे झाली...म्हणाली..

"
काकू..एका अपघातात हिचा पाय गेला...अन काय सांगू...हिची जुळी बहिण त्यातच गेली...गरती होती हो...!!!"

आई नुसती हसली...आम्ही निरोप घेतला...सर्वांचाच...मालूचा, तिच्या आईचा आणि अण्णांचा...

मी आईला हळूच म्ह्टल्याच मला आठवतय..

"
आई..ते मोदक उंदरांनी नव्हते हो खाल्ले...!!!"....अन आईने मला गप्प केले...

कुसुम समोर हे बोलायचे नव्हते ना......!!!!!!!!

(
माझी संपर्ण स्वतंत्र कथा..आत्ताच लिहून पूर्ण केली 
) 
Representative pictures taken from Google.

मधुसूदन थत्ते 

२६-१२-२०१४

No comments: