Wednesday, December 9, 2015

तन्मयाने... Tanmaya Panchpor...."In Praise of मुंबई" अशी एक सुरेख post टाकली आहे....तिचे मराठीप्रमाणेच इंग्रजी भाषेवरचे प्रभुत्व स्पष्ट झाले (अखेर मुंबईकर आणि त्यात engineer !!!!!)
पण त्या विषयावर म्हटले थोडे वेगळे लिहावे ...
मुंबई ही तर माझी जन्मभूमी...आणि ती होती त्या काळी Bombay ...
सात दशके मागे गेली आहेत ..
मी आज हे शहर दोन अस्तित्वात पहातो..
१) ते शहर म्हणून ..metropolitan शहर भारताची आर्थिक राजधानी...दिमाखाचे असे एक अस्तित्व...अहोरात्र जागे आणि झगमगणारे अस्तित्व...गगनाशी स्पर्धा करणारे शहर...सागराला मागे ढकलणारे शहर...
२) तो एक सकल मुंबईकरांचा एकवटलेला आत्मा म्हणून....
वरील १ बद्दल:
दशके आली आणि गेली...शहर खूप खूप बदलले, आकर्षक झाले...पण "माझे" नाही उरले...आज मागे ढकललेला समुद्र केविलवाणा झाला आहे...किना-यावरचा त्याचा वाळूचा अंगरखा ...चिंध्या झाल्यात त्याच्या...पोहण्याचे तलाव अमाप गर्दीने "डाळिम्ब्यांची उसळ" दिसते वरून...इमारती आभाळाला बोचतात...पश्चिमेचा वारा येतो खरा पण आल्हाद नाही देत....सुवास नाही देत....शहराला पण एक माणुसकी असते...एक जिव्हाळ्याचा स्पर्श करत असते शहर ...तो स्पर्श आज नसतो...
तेव्हा मी Lamington रोड वरून थेट काळा घोडा पर्यंत चालत जायचा...खूप खूप आनद मधासारखा गोळा करायचा...दादरला घरी येऊन तो चाखायचा...
आज धक्के धुक्के खात मी जाईन तसा चालत कदाचित..पण एकदाच...नंतर नाही वाटणार पुन: जावे...
वरील २ बद्दल
माझ्या मुंबईचा आत्मा (जो सकल मुंबईकरांचा एकवटलेला असा आहे) मात्र आज होता त्याहून निखरला आहे...अधिक उदात्त झाला आहे...अधिक श्रद्धाळू झाला आहे...आगत-स्वागत करण्यात अग्रेसर आहे...इथे माणुसकी वाढली आहे...जिव्हाळा वाढला आहे....हा मुंबईचा आत्मा थकून जातो...पण तरीही सौजन्य सोडत नाही...
सर्वामुखी बोलावतो..."या...रहा इथे....." असेल हवेची कमी..जागेची कमी..पाण्याची कमी....So what म्हणतो आणि सुरेख हसतो...हसणारा हा मुंबईचा आत्मा पाहून माझ्या सारख्या आज पुणेकर झालेल्याला मनात लग्गेच तुलना येते......
काश....वरच्या १ मध्ये असा स्वागतार्ह बदल होता तो ....!!!!
मधुसूदन थत्ते
२६-०८-२०१४

No comments: