Monday, September 8, 2014

ते दोघे सत्तरी पार केलेले असे जोडपे होते.

तुला गीत रामायणातलं कुठलं पद खूप भावतं? त्याने एकदा तिला विचारले...

"सगळीच चांगली ...काय सांगू? हं ते 'पराधीन आहे जगती..' जास्त आपलं वाटतं..." ती ...

"आपलं" ??..त्याच्या प्रश्नाचा रोख तिच्या लक्षात आला....

जरा वेळाने फोन वाजला....बातमी आली..."अमुक अमुक नुकत्याच गेल्या...वय होतं सत्तरीच्या आसपास ..पण तरी मनात येतं ना...'एक चाक निखळल'.."

त्यांनी एकमेकाकडे तात्काळ पाहिलं..दोघांच्याही जे मनात आलं त्याला कुणीच शब्दरूप दिले नाही...

पण जे काम वैखरीने टाळले ते पश्यंती ने केलेच..

ती म्हणाली...

"एवढ्याचसाठी आता स्वावलंबन हवे, शक्य तेवढे...गरजा खूप कमी करायला हव्या...बाह्य गोष्टीवरचे मन शक्यतो कमी करावे... विधिलिखित, जे अटळ आहे, त्यासाठी तयारी हवी...." !!!

त्याला हे माहित तर होते पण ते त्याने स्वीकारले नव्हते...स्वावलंबन आणि गरजा कमी करणे ह्यापासून तो दूर...खूप दूर होता...विधिलिखित, अटळ आहे? काय आहे विधिलिखित?...कोण जाणे?

मग तयारी ती कशी करायची?

हे काही तो बोलला नाही पण पुन: पश्यंतीनेच काम केले...

ती म्हणून गेली..."बाह्य गोष्टीवरचे मन काढावे आणि स्थिर करावे अंतर्मनापाशी...."

तो म्हणून गेला..."चल channel बदलू...संभाषणाचा...."

मधुसूदन थत्ते
०८-०९-२०१४
(स्वतंत्र स्वैर विचार)...............(चित्र प्रातिनिधिक आहे)

No comments: