Sunday, September 7, 2014

सर्व-संचित सद्भाव सफल होणारच...
विवेकानंदांचे क्षात्र-तेज, डो. हेडगेवारांची तळमळ आणि माणसावरचा विश्वास, लोकमान्यांची स्वराज्याची कल्पना, पंडित दीनदयालांचे बलिदान, गोळवलकर गुरुजींची साधना, शामाप्रसादांची निष्ठा, शास्त्रीजींचे साधेपण...........आणि....मित्रांनो, तुमचे आमचे भाग्य .....
हे केव्हा ना केव्हातरी सफल व्हायचे होते ना...!!
गेल्या १६ मे पासून ते व्हायला सुरुवात झालेली आपण पहातो आहोत....
खारीचा वाटा असेनाका...आपण तो द्यायला हवा....देणार आहोत...
Charity Begins at Home ... मोदीजींनी हे अंगी बाणले आहे...पण एक शिलेदार काय काय करणार..?
वर म्हटलेले सर्व-संचित सद्भाव सफल व्हायचे असेल तर आपल्यापुरते, आपल्या कुटुंबापुरते आपापले अर्घ्य ह्या पुण्यशील प्रवाहात आपण द्यावे...
सत्य, स्वत्व, सदाचार, सत्धर्म, सत्कर्म आणि सत्संगती ह्या सद्गुणांचा अंगीकार आणि प्रसार जितक्या जलद होईल तितकी भारतमाता अधिकाधिक समृद्ध होईल, सक्षम होईल...आणि ख-या अर्थाने वसुंधरेलाच आपले कुटुंब मानेल...
मधुसूदन थत्ते
०७-०९-२०१४





No comments: